“ठाकरे सरकारनं कौतुक करावं असं कोणतंही काम केलेलं नाही”

0
463

बीड,दि.२४(पीसीबी) – बीडमधील भाजप कार्यलयात बोलत असताना, माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी “कौतुक करावं असं काम नव्या सरकारकडून झालेलं नाही ” असं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

यावेळी बोलताना, ठाकरे सरकारकडून काही चांगलं काम होत असेल तर त्यांचं कौतुक नक्की करु, पण वाईट काम करणार असाल तर सरकारला सरळ करण्याची ताकद भाजप पक्षामध्ये आहे, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला आहे. जलयुक्त शिवार, जलसंजाल (वॉटर ग्रीड), जनतेमधून थेट सरपंच निवड, अशा योजना, निर्णयांवर बंदी आणण्याच्या कामातच नवं सरकार व्यस्त आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात मी चांगलं काम केलं. मंत्री म्हणून सत्कार स्विकारत फिरले नाही. अहोरात जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला. अभ्यास चांगला केला पण गुण देणं जनतेच्या हातात होतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.