झेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा

0
645

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. ‘मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम?,’ असा सवाल करतानाच ‘ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनेे सरळ पायउतार व्हावे, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,’ असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला आहे.