ज्याचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये – अविनाश जाधव

0
387

मुंबई,दि.९(पीसीबी) – पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनविरोधात मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या याच टीकेचा समाचार मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतला आहे.

ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये. मुख्यमंत्र्याकडे गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते, असं म्हणत अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, थोड्या दिवसाने अजित पवारच शिवसेना चालवतील. सत्तेसाठी शिवसेनेनं जी चूक केली आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.