ज्यांनी सरकार आणलं , त्यांना तरी ‘सामना’चं संपादकपद द्यायचं होतं – रामदास आठवले

0
620

मुंबई,दि.२(पीसीबी) – ज्यांनी सरकार आणलं , त्यांना तरी ‘सामना’चं संपादकपद द्यायचं होतं असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांच्यावरच शिवसेनेने अन्याय केला. किमान त्यांना ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं, असं म्हणत रामदास आठवले यांनी टोमणा मारला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे, असं आठवले म्हणाले आहेत. तसेच राज यांच्या युतीत येण्याने किंवा न येण्याने महायुतीला काहीही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्ली पेटवण्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा हात आहे, आपच्या नगरसेवकाने दंगल भडकवली. काँग्रसने त्याला हातभारच लावला, असं म्हणत आठवले यांनी टीका केली.