मुंबई, दि. १० (पीसीबी) – अवनी वाघिणीची शिकार नियमानुसार केली का नाही? याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती एक फार्स आहे. ज्या लोकांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर घेण्यात आले आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत समिती नियुक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत, अशी सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली. मग सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केला होता ? मग त्याचे श्रेय कसे घेतले. मग ह्या पापाचे धनी तुम्ही होणार का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.