Maharashtra

जे सत्य आहे, ते कायम सत्यच राहणार; नानांचे तनुश्रीच्या आरोपावर उत्तर  

By PCB Author

October 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ‘जे दहा वर्षांपूर्वी बोललो, तेच खरे आहे. जे सत्य आहे ते कायम सत्यच राहणार,’ असे अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पाटेकर बोलत होते. ते म्हणाले की, ‘तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.