जे शहाणपण आता सुचतंय, ते आधी का सुचलं नाही? – नवाब मलिक

0
543

औरंगाबाद,दि.३०(पीसीबी) – भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास आजही भाजपची सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समाचार घेण्यात आला आहे. हे शहाणपण आधी का सुचलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विचारला आहे.

भाजपची इच्छा असली, तरी शिवसेना त्यांच्यासोबत जाईल की नाही, हे शिवसेनेला विचारलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केली. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. जे शहाणपण आता सुचतंय, ते आधी का सुचलं नाही? असा प्रश्नही मलिक यांनी विचारला आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केल्याचं मलिक म्हणाले.

‘कमळाबाई’ला शिवसेनेने सोडलं आहे. भाजपची इच्छा आहे, ‘मी येतो-येतो’. पण आता शिवसेनेच्या हातात आहे, त्यांना सोबत घ्यायचं की नाही. ते निर्णय घेतील, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.