Maharashtra

‘जे खोटं आहे ते खोटंच आहे’; नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप पुन्हा फेटाळले

By PCB Author

October 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – जे खोटं आहे ते खोटंच आहे, असे सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांचे  पुन्हा एकदा  खंडन केले  आहे. ‘हाऊसफुल ४’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण करुन नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.    

नाना पाटेकर आज (शनिवार) दुपारी १२.३० च्या सुमारास जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि जोधपूरहून १.४५ च्या सुमारास जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. यानंतर नाना पाटेकर दुपारी ४ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर पडले.

यावेळी विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. परंतु नानांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर, ते म्हणाले की, दहा वर्षांपूर्वीच मी याबाबत बोललो आहे. जे खोटं आहे, ते खोटंच आहे.