जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा, नाहीतर ‘चुन चुनके…’; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

0
540

पुणे, दि. २६ (पीसीबी) – केंद्रातील आणि  राज्यातील भाजप  सरकारने  गेल्या चार वर्षात   विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. सरकारने आता जे काही करायचे आहे, ते वर्षभर करा, त्यानंतर  खपवून घेतले जाणार नाही,  ‘चुन चुनके…’ आणि ‘चुकीला माफी नाही’ अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला  इशारा दिला.