जुमलेबाजीमुळेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला  

0
453

शिर्डी,  दि. २१ (पीसीबी) – गेल्या ३० वर्षांपासून मी राम मंदिराविषयी ऐकत आहे. निवडणूक जवळ आली की त्यांना राम मंदिराचा मुद्दा आठवतो. मात्र, मंदिर कधी बांधणार ? असा सवाल करतानाच ‘जुमलेबाजी चालत आहे, त्यामुळेच राम मंदिरांचा मुद्दा हाती घेतला’, असा टोला  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला.