Notifications

जिना पंतप्रधान झाले असते, तर भारताची फाळणी झाली नसती – दलाई लामा

By PCB Author

August 08, 2018

पणजी, दि. ८ (पीसीबी) – पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, अशी महात्मा गांधी यांची इच्छा होती. परंतु त्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध दर्शवला होता. जिना देशाचे पंतप्रधान झाले असते, तर भारताची फाळणी झाली नसती, असे तिबेटीयन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी म्हटले आहे.