Maharashtra

“जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं”

By PCB Author

January 30, 2020

मुंबई,दि.३०(पीसीबी) – देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. बुधवारी बीडमध्ये संविधान बचाव सभेत केलेल्या या वक्तव्यावर आव्हांडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत, असंही चव्हाणांनी म्हटलं आहे.