जालन्यातून रावसाहेब दानवे दणदणीत विजयी

0
565

जालना, दि. २३ (पीसीबी) – जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे विजयी झाले आहे. रावसाहेब दानवेंनी जालन्यातून चांगल्या लीडने विजय मिळवला आहे.

जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवें आणि काँग्रेसचे विलास औतडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. रावसाहेब दानवे आणि विलास औतडे यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.

रावसाहेब दानवेंचा दणदणीत विजय झाला आहे ते सलग पाचव्यांदा निवडूण आले आहेत. दानवेंसमोर  औतडे यांनी चांगलच आव्हान निर्माण केले होते. मात्र औतडे यांचा पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.