Desh

जवान शहीद झाल्यानंतर मोदी नॅशनल पार्कमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त होते; काँग्रेसचा आरोप  

By PCB Author

February 21, 2019

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश दुख:च्या डोंगरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

जगात तुम्ही असा पंतप्रधान कुठे पाहिला आहे का? माझ्याकडे खरोखर बोलण्यासाठी शब्द नाहीत, असे  काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्याला गांर्भीयाने घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. या हल्ल्यावरुन भाजप राजकारण करत  आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

शहिदांच्या सन्मानापेक्षा  मोदींना सत्तेची लालसा अधिक आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आसामच्या सभेत  बोलताना जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, कारण आता केंद्रात काँग्रेसचे नाही भाजपाचे सरकार आहे, असे सांगून त्यांनी राजकारण करण्याचा  प्रयत्न केला,असा आरोपही काँग्रेसने केला.