“जर समीर वानखेडे हिंदू असते, तर त्यांचा निकाह….” ; आता थेट निकाह लावणाऱ्या काझींनी केला मोठा खुलासा

0
315

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी क्रूजवर कारवाई करून आर्यन खानला अटक केल्यानंतर त्यांच्यावर नवाब मलिक यांनी सातत्याने टीका केली आहे. मात्र, आता त्यांच्या धर्माविषयी मोठी चर्चा सुरू असून समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केला जात आहे. हे आरोप खुद्द समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले असले, तरी त्यांचा पहिला विवाह मुस्लीम महिलेशी झाला असून तो लावणाऱ्या काझींनी समीर वानखेडेंचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबत झालं. हे लग्न मुस्लीम पद्धतीने झालं. मात्र, आईच्या आग्रहाखातर मुस्लीम पद्धतीने विवाह केल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला असताना त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “जर समीर वानखेडे हिंदू असते, तर त्यांचा निकाह झालाच नसता. सगळेच मुसलमान होते. समीर, शबाना, त्यांचे वडील दाऊद आणि मुलीचे वडील जाहीद हे देखील मुसलमानच होते. मुसलमान नसते, तर हे नातंच झालं नसतं, काझीनं हा निकाह पढला नसता आणि २ हजार लोकांना दावत देखील झाली नसती”, असं वक्तव्य त्यांचं लग्न लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी घेतली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावरून या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.