Desh

जम्मू-काश्मीरचमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ जवान शहिद

By PCB Author

February 14, 2019

पुलवामा, दि. १४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरात सीआरपीएफच्या गाडीला अतिरेक्यांनी विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक देत स्फोट घडवून आणला त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार देखील केला. ही घटना आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास घडली.  या भयाड हल्ल्यात ३९ भारतीय जवान शहीद झाले आहेत.

जैश ए मोहम्मदने या अतिरेकी संघटनेने हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक देऊन स्फोट घडवून आणला. त्या नंतर अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार देखील केला. या घटनेत ३९ जवान शहीद झाले आहेत. तर २० पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. जैश ए मोहम्मदने या अतिरेकी संघटनेतील आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवल्याचे समोर आले आहे.