Maharashtra

जनतेशी बेईमानी केलेले हे सरकार फार काळ टिकणार नाही- फडणवीस

By PCB Author

January 01, 2020

मुंबई, दि.१ (पीसीबी) – शिवसेनेचे आदेश आता मातोश्रीवरून निघत नाही तर दिल्लीतल्या ‘मातोश्री’ आदेश देतात आणि ते सेनेवाले ऐकतात अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पालघमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, “जनतेशी बेईमानी केलेले हे सरकार काही झाले तरी जास्त वेळ टिकणार नाही. शिवसेना ही सकाळी शेर तर संध्याकाळी ढेर होते. शिवसेनेची लोकसभेत आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री बनवण्याचे वचन तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? असा सवाल विचारावा लागतो. कारण आता ‘मातोश्री’वरुन नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात”, असा टोला फडणवीसांनी लगावला.