Maharashtra

जनतेचा कौल आमची झोप उडवणारा – मुख्यमंत्री

By PCB Author

May 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – देशाने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. मागिलवेळी मोदींची लाट होती यंदा सुनामी आली आहे. हा आकडा बघून आमची झोप उडाली आहे. कारण, आता आमची जबाबदारी वाढली आहे. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेऊन  व्यक्त केले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात दुष्काळी परिस्थिती असूनही जनतेने युती सरकरच्या कामावर विश्वास दाखवला आहे. म्हणूच जनतेचा कैाल पाहिल्यानंतर आता पुन्हा कामांना लगेचच सुरूवात करणार आहोत. आमच्या सहकारी पक्षांबरोबच जनतेचेही आभार. महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी विजयासाठी प्रयत्न केले. रामदास आठवले यांनी तर त्यांच्या पक्षाचा उमेदवार नसतानाही सभा घेतल्या त्यांचेही विशेष आभार.