छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून गुंडांनी शाळेत घुसून ४० विद्यार्थिनींना केली जबर मारहाण

0
522

पाटणा, दि. ७ (पीसीबी) – छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून बिहारच्या सुपौलमधील कस्तुरबा निवासी बालिका श्रमातील ४० विद्यार्थिनींना काही गुंडांनी शाळेमध्ये घुसून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास घडली.

या घटनेत अनेक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुंडांनी छेडछाड केल्याची तक्रार शिक्षकांना केल्याच्या रागातून ही मारहाण केली असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी काही विद्यार्थिनी शाळेच्या परिसरात खेळत होत्या. त्यावेळी काही रोड रोमियोंनी या विद्यार्थिनींबाबत अश्लिल वक्तव्ये करत त्यांचे छडे काढली. त्यानंतर विद्यार्थिनींनी याबाबत त्यांच्या प्राध्यापकांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राध्यापक आणि इतर काही लोक या गुंडांना समजावण्यासाठीही गेले होते. पण त्या गुंडांनी त्यांच्याबरोबरच वाद घातला होता.  काही वेळानंतर ही गुंड मुले त्यांचे पालक आणि इतर लोकांना घेऊन शाळेकडे परतले आणि त्यांनी शाळेवर हल्ला चढवला. त्यात अनेक विद्यार्थिनींना मारहाण केली. तसेच काही शिक्षकांनाही मारहाण करण्यात आली.