Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला कोणी ज्ञान देण्याची गरज नाही – संजय राऊत

By PCB Author

January 16, 2020

मुंबई,दि.१६(पीसीबी) – शिवसेनेने सदैव छत्रपती शिवाजी महारांजासमोर नतमस्तक होण्याचं कर्तव्य बजावलेलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचं दैवत आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे. तेव्हा आम्हाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी शिवाजी महाराजासंदर्भातील आपलं अंतरंग तपासून पहावं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपाच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा किंवा अन्य ठिकाणी देखील ज्या गाद्या आहेत. जे राज्य त्यांनी निर्माण केलं आहे. त्या गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर राखलेला आहे. छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होणं हे प्रत्येक हिंदू व मराठी माणसाचं कर्तव्य आहे. असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा , तंगड्या प्रत्येकाला असतात, सामान्य माणूस देखील उत्तर देऊ शकतो असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.