Maharashtra

छत्रपतींच्या घरात फुट पाडणाऱ्यांची पुढील २५ वर्ष सत्ता येथे येता कामा नये : धनंजय मुंडे

By PCB Author

August 07, 2019

सोलापूर, दि. ७ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे . सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा अजेंडा जनते समोर मांडण्यासाठी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढली आहे. या यात्रेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पक्षांतरावरून धनंजय मुंडे म्हणाले की, छत्रपतींच्या घरात फुट पाडणाऱ्यांचे पुढील २५ वर्ष सत्ता येता कामा नये. ज्यांनी छत्रपती स्मारक उभारले नाही हा आपला अपमान नाही का ? याचा बदला घेण्याची वेळ विधानसभेत येणार आहे. ती वेळ सोडू नका, असे मुंडे म्हणाले .

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे घर फोडण्याचे काम अनाजी पंथांनी केले, तर 21 व्या शतकात छत्रपतींचे घर फोडण्याचे काम कोण करत आहे ? हे आता तुम्हीचं ओळखा, असे, म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला आहे.