Maharashtra

चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे; अजित पवारांना शरद पवारांचा टोला

By PCB Author

November 25, 2019

सातारा,दि.२५(पीसीबी) – अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज साताऱ्यात बोलताना चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे, असं टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

मी आणखी राष्ट्रवादीतच आहे आणि कायमस्वरूपी राष्ट्रवादीतच राहिल. शरद पवार हेच माझे कायमस्वरूपी नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल, असं ट्वीट अजित पवार यांनी काल केलं होतं. त्यावर अजित पवार यांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं आहे आणि खोटारडं आहे, असं म्हणत अजित पवार यांची भूमिका पक्षाशी सुसंगत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

आज माजी उपपंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन आहे. त्याच निमित्ताने शरद पवार कराडमध्ये आले होते. त्यांनी प्रितीसंगमावर जात यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.