मुंबई दि. २१ (पीसीबी) – मुंबईत हा विषाणू झपाट्याने पसरत असून त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने शाळा बंद आहेत.
याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावांकडे जायला निघाले आहेत. मात्र, त्यामुळे गावाकडच्या लोकांना चिंतेने ग्रासले आहे. तीच चिंता नीतेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.
एक नम्र विनंती
सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे निघाले आहेत..
या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबई च्या घरी राहावे कारण गावी आल्यामुळे इथे virus पसरण्याची शक्यता आहे!
हि वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!— nitesh rane (@NiteshNRane) March 20, 2020