मुंबई, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपामध्ये सामिल झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते. त्यावर महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांचे हे विधान हास्यास्पद आहे, असे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये सामिल झाल्यास आश्चर्य वाटालयला नको, असे विधान केले होते. यावर विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वजित कदम म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे सतत असे विधान करत असतात. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या खांद्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ते सतत अशी विधाने का करतात हे त्यांनाच ठाऊक. आपण यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पतंगराव कदम यांनी पक्षात चार दशके काढली. त्यामुळे यापुढेही आपण काँग्रेसच्या विचारांनीशीच काम करणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.