घर खरेदी करण्यास हाच उत्तम काळ – भीमसेन अग्रवाल

0
457

पिंपरी,  दि. १४ (पीसीबी) –  भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पुन्हा पाव टक्क्यांची कपात जाहीर करून ६ टक्क्यांवर आणला आहे. तसेच घरांचे बाजारपेठेतील विक्रीमूल्य ठरवणाऱ्या रेडी रेकरनरच्या दरांमध्येही यंदा कोणतीही वाढ होणार नसून,२०१८-१९  या वर्षासाठी २०१७-१८ चेच दर कायम राहणार आहेत. यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निश्चित  स्वागतार्ह आहे.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून जागेच्या कागदोपत्री मूल्यात वाढत झाली नसल्याचा सकारात्मक संकेत या निर्णयातून होतो. ग्राहकांनी हे लक्षात घेऊनच  आता घरांच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता करू नये. घरांचा दर आज मितीला असणारा नीच्चांकी दर असून इथून पुढे याहून हा दर अजून कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा लाभ घेवून घर खेरेदी हाच उत्तम काळ असल्याचे पिंपरी चिंचवडचे विश्वसनीय म्हणून आळखले जसणारे ऐश्‍वर्यम् ग्रुपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांनी म्हटले आहे.

आमच्या संस्थेच्या वतीने सुमारे २१५ ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ व जीएसटी आणि अन्य छुप्या खर्चात सुट मिळवून देत, जो फ्लॅट २५ लाखाचा आहे, तो फक्त सुमारे १९, ७३००० रूपयात  ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यामुळे हीच योग्य वेळ आहे फ्लॅट खरेदी करण्याचा, असे अग्रवाल यांनी सांगितले.

ऐश्‍वर्यम् गु्रप एफएमसीजी मॅन्युफक्चरिंग आणि कन्सट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. आता पर्यंत कन्स्ट्रक्शन मध्ये ६ निवासी प्रोजेक्ट आणि कमर्शियल प्रोजेक्ट ऐस्सन ग्रुप ने बनविले आहे.  ऐश्‍वर्यम्, ऐश्‍वर्यम् कोर्टयार्ड, ऐश्‍वर्यम् कंफर्ट,  ऐश्‍वर्यम् निवारा, ऐश्‍वर्यम् हमारा आणि कमर्शियल मॉल ऐश्‍वर्यम् वून आणि  ऐश्‍वर्यम् कंफर्ट गोल्डचा समावेश आहे. आता पर्यंत एकूण २५ लाख चौ.फुटाचे बांधकाम केले आहे. ३००० फ्लॅटचे हस्तांतरण केले आहे. एकूण ५० लाख चौ.फुटाचे सध्या बांधकाम चालू आहे.  सर्व प्रोजेक्टस् रेरा प्रमाणित आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात  ऐश्‍वर्यम् नावाचे साम्राज्यात अनेक चांगले प्रोजेक्ट दिले आहेत, असेही ऐश्‍वर्यम ग्रुपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांनी सांगितले.