Maharashtra

गाजराची पुंगी वाजवायलाही सरकारकडे पैसा नाही – अशोक चव्हाण

By PCB Author

February 18, 2019

सोलापूर, दि. १८ (पीसीबी) – गाजराची पुंगी करुन वाजवायलाही सरकारकडे पैसा शिल्लक नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  सोलापुरातील मुळेगाव तांडा येथील बंजारा मेळाव्यात बोलताना केली. 

चव्हाण यावेळी म्हणाले की, सरकार सर्व समाजाला आश्वासनाचे गाजर दाखवण्याचे काम करत आहे. बौद्ध, मातंग, बंजारा समाजासाठी असणाऱ्या विकासाच्या योजना सरकारने बंद केल्या आहेत.  भाजप सरकारला ५ वर्षात बरोजगारांना काम देणे शक्य झालेले नाही. आता म्हणतात चहा, भजी विका. हे सरकार फसवे आहे, असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगून येत्या ८ दिवसांत आघाडीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.