गांधी जयंतीनिमित्त राज्यातील १०० कैद्यांची सुटका होणार!  

0
367

नाशिक, दि. २ (पीसीबी) – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १०० कैद्यांना सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून सर्वाधिक कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

येत्या ५ ऑक्टोबरला या सर्व कैद्यांची सुटका केली जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ मध्यवर्ती कारागृह तसेच वर्धा आणि धुळे कारागृह अशा एकूण ११ कारागृहांतून १०० कैदांची सुटका केली जाणार आहे.