कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) – सांगली-कोल्हापूरतील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापुरातील मुस्लीम समाज एकवटला आहे. सोमवारी असलेल्या बकरी ईदला बकरी न कापता ते पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार आहेत.
“पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की आपल्या शेजारच्या घरात जर अन्न शिजत नसेल तर आपले घरातील अन्न हे पहिल्यादा त्या घरात दिले पाहिजे…तो कोणत्याही धर्माचा वा जातीचा असू दे…तर चला आपण आपल्या बांधवाची मदत करू”, अशा आशचाये पत्रक मुस्लिम समाजाने काढले आहे. शेतकरीवर्गाचे हाल झालेले आहेत, मुक्या प्राण्यांची वाताहात झालेली आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. यामुळे मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.