कोरोनाचे राज्यात अर्धशतक, मृतांची संख्या १६३५ – केरळकडून ५० डॉक्टर,१०० परिचारिका मागविल्या

0
376

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यातील कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. आता तो 50 हजाराच्या पुढे गेला आहे. तर रविवारी एकाच दिवशी तीन हजारहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात आज 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्य़ाचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच आता गुणाकार सुरू होत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केल्याने आगामी पंधरा दिवसांत परिस्थिती किती भयंकर असेल याची कल्पना येते.

रविवारी दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजवर पाठविलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारकडे तज्ञ डॉक्टर आणि नर्सेस द्यावे अशी मागणी केली आहे. केरळच्या आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे. भविष्यात पुणे आणि मुंबईत रूग्णांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आणखी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची गरज पडणार आहे. मुंबई पुण्यात आवश्यकतेनूसार नव्या आरोग्य व्यवस्था उभ्या कराव्या सांगणार आहे.

केरळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना डॉक्टर लहाने यांनी संपर्क साधला आहे. त्यानुसार किमान 50 तज्ञ डॉक्टर आणि 100 नर्स देण्याच्या विनंती लहाने यांनी केली आहे. विशेष म्हणजे करारावर आलेल्या ह्या आरोग्य कर्मचारांना चांगले मानधन मिळणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार, तज्ञ डॉक्टरांना 20 लाख तर नर्संना 30 हजार मानधन मिळेल. केरळहून आलेल्या ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाचे, जेवणाची आणि योग्य ती सुरक्षा देण्याची हमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

जिल्हा व महापालिका निहाय रुग्णांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका : 30542 (988)
ठाणे: 420 (4)
ठाणे मनपा: 2590 (36)
नवी मुंबई मनपा: 2070 (29)
कल्याण डोंबिवली मनपा: 889 (7)
उल्हासनगर मनपा: 189 (3)
भिवंडी निजामपूर मनपा: 86 (3)
मीरा भाईंदर मनपा: 464 (5)
पालघर: 114 (3)
वसई विरार मनपा: 562 (15)
रायगड: 412 (5)
पनवेल मनपा: 330 (12)

नाशिक: 115
नाशिक मनपा: 110 (2)
मालेगाव मनपा: 711 (44)
अहमदनगर: 53 (5)
अहमदनगर मनपा: 20
धुळे: 23 (3)
धुळे मनपा: 95 (6)
जळगाव: 294 (36)
जळगाव मनपा: 117 (5)
नंदूरबार: 32 (2)

पुणे: 340 (5)
पुणे मनपा: 5075 (251)
पिंपरी चिंचवड मनपा: 267 (7)
सोलापूर: 24 (2)
सोलापूर मनपा: 522 (32)
सातारा: 279 (5)

कोल्हापूर: 236 (1)
कोल्हापूर मनपा: 23
सांगली: 69
सांगली मिरज कुपवाड मनपा: 11 (1)
सिंधुदुर्ग: 10
रत्नागिरी: 155 (3)

औरंगाबाद: 23
औरंगाबाद मनपा: 1233 (46)
जालना: 56
हिंगोली: 112
परभणी: 17 (1)
परभणी मनपा: 5

लातूर: 67 (3)
लातूर मनपा: 4
उस्मानाबाद: 31
बीड: 26
नांदेड: 15
नांदेड मनपा: 83 (5)

अकोला: 36 (2)
अकोला मनपा: 366 (15)
अमरावती: 13 (2)
अमरावती मनपा: 155 (12)
यवतमाळ: 115
बुलढाणा: 40 (3)
वाशिम: 8

नागपूर: 7
नागपूर मनपा: 464 (7)
वर्धा: 4 (1)
भंडारा: 10
गोंदिया: 39
चंद्रपूर: 10
चंद्रपूर मनपा: 9
गडचिरोली: 13

इतर राज्ये: 49 (11)
एकूण: 50 हजार 231 (1635)