मुंबई, दि. १३ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याची पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना आदेश दिले होते. त्याबाबतची माहिती आयोगाने मागवावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.