औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
दुष्काळ जाहीर करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक कारवाई पुर्ण करून टंचाईची परिस्थिती जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळ केंद्र सरकार जाहीर करते. केंद्राची टीम मराठवाड्यात पाहणीसाठी येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे, असा दावाही त्यांनी केला.