कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही- विन्टा नंदा

0
497

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – आलोकनाथने विन्टा नंदा यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा टाकल्यानंतर असल्या कोणत्याही दाव्यांना आणि धमक्यांना घाबरणार नसल्याचे स्पष्टीकरण विन्टा नंदांनी दिले आहे. तसेच येत्या काळात आलोकनाथविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही विन्टाने स्पष्ट केले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी विन्टा नंदाने अभिनेता आलोकनाथवर १९ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे आरोप लावले होते. या आरोपांनंतर आलोकनाथवर सगळीकडूनच टीका होते आहे. तसेच आपण बलात्कार केला नसल्याचा खुलासा करत आलोकनाथने विन्टावर मानहानीचा दावा ठोकला. यानंतर विन्टाच्या वकिलाने आपण या दाव्यांना घाबरत नसून कायदेशीरपणे खटला लढणार आहोत असे स्पष्ट केले आहे. ‘हे दावे आणि आरोपीच्या धमक्या फक्त माझ्या अशीलाला त्रास देण्यासाठी आहेत’ असे विन्टा नंदांच्या अशीलाचे म्हणणे आहे. आलोकनाथची पत्नी आशू सिंह हिनेही या प्रकरणाचा नीट तपास व्हावा अशी मागणी कोर्टात केली आहे. तेव्हा नंदा या प्रकरणाला लॉजिकल कन्क्लुजनला नेतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.