केसरकर कितीही पळाले, तरी जिंकणार नाहीत, कारण आमचे वजनच वेगळे आहे- निलेश राणे

0
966

सावंतवाडी, दि.१७ (पीसीबी) – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर  कितीही पळाले, तरी ते जिंकणार नाहीत, कारण आमचे वजनच वेगळे आहे, असा मिश्किल टोला माजी खासदार निलेश राणे यांनी लगावला.  येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  राणे बोलत होते.  

यावेळी ते म्हणाले की,  माजी आमदार परशुराम उपरकर यांना पक्षात  घेण्याइतपत राणेंना  इतके वाईट दिवस आलेले नाहीत. उपरकर आता विधानसभा लढवून थकले आहेत. त्यामुळे आता त्यांनी ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, असाही टोला राणे यांनी यावेळी लगावला.

राणे म्हणाले की, वाळूचा  लिलाव रखडल्यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांना मोठा फटका  सहन करावा लागत आहे. केवळ पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. याचा राग बाहेर काढण्यासाठी केसरकरांनी हा प्रश्न तसाच लोंबकळत  ठेवला आहे. मात्र, आम्ही या प्रश्नांवर तोडगा काढणार आहे, असे राणे म्हणाले.