तिरूअनंतपुरम, दि. १८ (पीसीबी) – अतिवृष्टी आणि नद्यांना आलेला महापूर यामुळे केरळमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या शंभर वर्षातील हा केरळमधील सर्वात भीषण पूर आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची मोदी यांनी घोषणा केली. तसेच पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला १०० कोटींची मदत जाहिर केली होती.