Desh

केजरीवाल सरकारकडून दिल्ली अग्नीतांडवातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर

By PCB Author

December 08, 2019

नवी दिल्ली,दि.८(पीसीबी) – दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत ४४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत केजरीवाल सरकारने जाहीर केली आहे.

आगीची घडलेली ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत देण्यात येईल. तर जखमींना एक लाख रूपयांची मदत देण्यात येईल. त्याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार देईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

राणी झाशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नीतांडव घडलं. आगीत जखमी झालेल्या लोकांना आरएमएल, एलएनजेपी, हिंदूराव आणि सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.