नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – कुत्रा कोण आणि सिंह कोण ?असा सवाल करून भारताच्या संविधानाने सगळ्यांना मानव मानले आहे. कोणालाही कुत्रा किंवा सिंह म्हटलेले नाही. आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही, हीच त्यांची सर्वात मोठी अडचण आहे, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.