Desh

कुणाजवळ काहीही असो ‘हमारे पास पवार साहब है

By PCB Author

February 22, 2020

दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. या वेळी बोलताना ते म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, ‘विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही वल्गना केल्या तरी शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असेपर्यंत काही होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार, त्यांनी केलेली कामे हे आपले फार मोठे भांडवल आहे. कुणाजवळ काहीही असो ‘हमारे पास पवार साहब है’. राष्ट्रवादीला चांगली खाती मिळालेली आहेत हे शरद पवार यांचे यश आहे.” असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. यापुढेही आपण असेच जोमाने काम करून इतर लहान-मोठ्या निवडणुकांत बाजी मारणार आहोत. असेही ते यावेळी म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजप व शिवसेना महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही आम्ही विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता करून घेतली होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवून तीन पक्षांचे सरकार तयार केले.