“कुणाचीही चौकशी करा, आम्ही नाही घाबरत”

0
408

मुंबई,दि.२७(पीसीबी) – कोरेगाव भीमा प्रकरणात कुणाचीही चौकशी करा आम्ही नाही घाबरत जा. कारण तुमचं सरकार कमी काळाचं आहे. त्यामुळे ज्याकाही चौकशा करायच्या आहेत त्या आटपून घ्या, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत चौकशीची मागणी व्हावी म्हणून कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना ‘अर्बन नक्सल’ या शब्दाचा उल्लेख केला नव्हता आणि पाठीमागच्या काळापासून त्यांची विधाने विचारात घेतली असता ती विधाने परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच आता त्यांची चौकशी व्हावी, त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जावं, अशी मागणी लाखे पाटील यांनी केली आहे.