काश्मीर समस्या सोडवण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही – राजनाथ सिंह

0
466

श्रीनगर, दि. २१ (पीसीबी) –  काश्मीर समस्या  जर कोणाला चर्चेने सोडवायची नसेल, तर ती कशी पद्धतीने सोडवायची, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशारा देऊन काश्मीर समस्या सोडवण्यापासून जगातील कोणतीही ताकद आम्हाला रोखू शकत नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राजनाथ सिंह यांच्या हस्ते कश्मीरमध्ये विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते  म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल. फुटीरवादी नेते म्हणतात की त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना पकिस्तानमध्ये जसे स्वातंत्र्य आहे तसे हवे का? ज्येष्ठ नेते फुटीरवाद्यांशी संवाद साधायला गेले परंतु त्यांनी बोलणे टाळले.

पण कश्मीर प्रश्न नक्की सुटणार. हा प्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा इतरही आपल्याकडे  मार्ग आहेत. दहशतवादप्रश्नी ज्या पद्धतीने संपूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे, त्यामुळे काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळू शकते. काश्मीर खोऱ्यातील सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.