Chinchwad

काळेवाडीत मुलगा होत नसल्याने विवाहितेचा छळ

By PCB Author

December 12, 2018

काळेवाडी, दि. १२ (पीसीबी) – वंश वाढवण्यासाठी मुलगा दिला नाहीस तर तुला नांदवणार नाही, अशी धमकी देऊन सासरकडच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरिक आणि माणसिक छळ केला. ही घटना काळेवाडी ज्योतीबानगर येथे सासरी राहत असलेल्या विवाहितेसोबत घडली.

याप्रकरणी पीडित २७ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राजेंद्र शिंदे आणि सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल आणि राजेंद्र यांचा २०१३ साली विवाह झाला होता. मात्र लग्नात पीडित महिलेला तिच्या आई-वडिलांनी सोने दिले नाही. तसेच आरोपींनी शीतल यांच्या माहेरच्या मंडळींकडे दुचाकीची मागणी केली. ती दुचाकी देखील दिली नाही म्हणून पीडितेचा शारिरिक आणि माणसिक छळ केला जात होता. तसेच घराण्याला वंशाला दिवा दिला नाही तर तुला नांदवणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी सासरकडच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.