काळानुसार पक्षसंघटनेत बदल करावे लागतात – अजित पवार

379

पिंपरी, दि, १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नविन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे. काळानुसार काही बदल करावेच लागतात, तसेच पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी  पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी ते सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघरे, दत्ता साने, नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवर देखील टीका केली. पारदर्शक कारभाराची हमी देत भाजप महापालिकेत सत्तेवर आले. ठेकेदारांमधील रिंग आणि निविदा प्रक्रियेशिवाय मर्जीतील ठेकेदारांना काम दिल्यामुळे पारदर्शकतेचे बुरखा फाटल्याचे पवार यांनी सांगितले.