कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी गद्दार, देशद्रोही ठरत नाही

0
278

औरंगाबाद, दि.१५ (पीसीबी) – सुधारित सीएएविरोधात आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएए आणि एनआरसी च्या विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. यातील काही आंदोलने शांततेच्या मार्गाने होत आहेत तर काही आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे.

या याचिकेच्या सुनावणीवेळी ‘कायद्याविरोधात आंदोलन केल्याने कोणी गद्दार, देशद्रोही ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी म्हटले.’ या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी त्यांचे मत व्यक्त केले. आंदोलनांमुळे सीएएतल्या कोणत्याही तरतुदींची अवहेलना होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आंदोलक केवळ एका कायद्याला विरोध करत असल्याने त्यांना देशद्रोही, गद्दार म्हटले जाऊ शकत नाही. असे खंडपीठाने पुढे म्हटले आहे.