नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर मानले जाते. या शिखरावर पोहचताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बिप्लब बैद्य आणि कुंतल कनरार अशी या दोघांची नावे आहेत. बिप्लब बैद्य हे ४८ वर्षांचे तर कुंतल हे ४६ वर्षांचे होते. बिप्लब बैद्य गिर्यारोहण करताना आजारी पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कुंतल करनार शिखरावर चढताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. बैद्य हे ८ हजार ५८६ मीटर्स अंतरापर्यंत चढाई करून गेले होते.
बिप्लब बैद्य हे आजारी झाले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे समजते आहे. कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर आहे.