मुंबई, दि. १७ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसला आदर आहे. काँग्रेस सावरकरविरोधी नाही, मात्र त्यांच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतभेद आहेत, असे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण केले होते. भारतरत्न कुणाला द्यायचे हे एक समिती ठरवते, काँग्रेस सावरकरविरोधी नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी आपले सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी सावरकरांविषयी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.