काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनो काळजी घ्या; लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय – जितेंद्र आव्हाड

0
648

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, कारण लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे.

काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर “महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! – जनहितार्थ जारी, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.