काँग्रेस, तेलगू देसम पाकिटमारांचे पक्ष; असदुद्दीन ओवेसींचा घणाघात

0
395

तेलंगणा, दि. २ (पीसीबी) – काँग्रेस आणि तेलगू देसम हे दोन्ही पक्ष पाकिटमारांचे पक्ष आहेत, अशी घणाघाती टीका ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मलकपेट येथील सईदाबादमध्ये आज (रविवार) जाहीर सभा झाली.  

यावेळी ओवेसी बोलताना म्हणाले की, तेलंगणमधील तरुणांना कारागृहात डांबण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडूंमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तेव्हा काँग्रेस आणि स्वयंघोषित ‘जनेऊधारी हिंदू’ कुठे होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधींना आमच्या अडचणी, समस्या यांची जाणीवही नाही. राजमहालात त्यांनी त्यांचे आयुष्य व्यतित केले आहे. ते एक पर्यटक म्हणून भारतात येतात. तुम्ही कधी लाठीमाराला सामोरे गेला आहात का? तुमच्या धर्मावरून तुम्हाला कधी कोणी बोल लावले आहेत का? तुमच्यावर कधीतरी अन्याय झाला आहे का? अशी प्रश्नांचा भडीमार त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

काँग्रेसच्या सभेला बसमधून लोक  आणली जातात. त्यासाठी त्यांना १०० रुपये आणि पाकीट दिले जाते, असा आरोप ओवेसी यांनी केला. कोणताही पक्ष आम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास ओवेसी यांनी यावेळी व्यक्त केला.