काँग्रेसच्या जागा कमी करण्यात राहुल गांधींची मदत मिळेल; मुख्यमंत्र्यांचा टोला  

0
319

कणकवली, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन कितीही डोकं आपटलं तरी काही फरक पडणार नाही. काँग्रेसचे ४२ ते २४ होतील, हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते बँकॉकला फिरायला गेले होते,  असा टोला  मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.  

कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत  बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधींची सभा झाल्याने मला आनंद झाला आहे. कारण काँग्रेसच्या जागा कमी करण्यात राहुल गांधींची मदत नक्की मिळेल.

राष्ट्रवादीत राहायला कोणी तयारच नाही. शरद पवारांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी झाली आहे, असे त्यांनी म्हटले.  पाच वर्षात जे केलं त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे, तुम्ही १५ वर्षांचा हिशोब द्या, असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.  २०२१ पर्यंत प्रत्येक बेघराला घर देणार, तसेच कोकणालाही टँकरमुक्त करणार,  अशी ग्वाही  दिली.