काँग्रेसचं इंजिन खराब झालंय, कितीही धक्का मारला तरी विजय गाठणं अशक्य; मुनगंटीवारांची खोचक टीका

0
412

वर्धा, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेसचं इंजिन खराब झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसेच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन तर वर्ध्यात नवीन बसस्थानकाचे लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी ते स्वप्न काही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते. एवढे वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि फक्त मोदी हटावचा नारा देऊन निवडणुकीत प्रचार फक्त काँग्रेसने केला. गेल्या ४७ वर्षांत काँग्रेसने कोणतीही विकासकामे केली नाहीत. जनतेला हे माहीत आहे त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नसल्याची टीकाही मुनगंटीवारांनी केली आहे.