काँग्रेसकडून न्यायव्यवस्थेची ताकद संपवण्याचा प्रयत्न – पंतप्रधान मोदी

0
491

प्रयागराज, दि. १६ (पीसीबी) –  काँग्रेस पक्षाने नेहमीच सत्ता आणि पळवाटा वापरून न्यायव्यवस्थेची ताकद संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) रायबरेलीमधील एका कार्यक्रमात केला. सध्या काही जणांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  हे नुकत्याच घडलेल्या राफेल प्रकरणामुळे  पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसचे आजपर्यंतचे वर्तन आणि त्यांनी रचलेल्या कारस्थानांवरून एकच सिद्ध होते ते नेहमी स्वत:ला देश, लोकशाही, जनता आणि न्यायव्यवस्था यापेक्षा उच्च समजतात. आपल्या इच्छेनुसार काम करण्यास नकार देणाऱ्या प्रत्येकाला संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. काँग्रेस  केवळ लोकशाहीच्या बाजून उभे असल्याचे ढोंग करतो. अशा परिस्थिती देशातील नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले.

यावेळी मोदी यांनी राफेल व्यवहार व शेतकऱ्यांची कर्जमाफी यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. संरक्षण खरेदी व्यवहारात आतापर्यंत इटालियन व्यावसायिक ओटाव्हियो क्वात्रोचीचा सहभाग होता. मात्र, आम्ही राफेल व्यवहारात त्यांना बाजूला ठेवले. त्यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाला आहे, अशी टीका मोदी यांनी यावेळी केली.