कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड

0
637

मुंबई, दि.८ (पीसीबी) – शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांद्वारे सुरु असलेल्या हिशेबात जाणूनबुजून गडबड केल्याची तक्रार अनेक शेतकर्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर केली आहे. आणि या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी सरकारकडे एक अहवाल सादर केला आहे. नियमानुसार कर्ज घेतलेल्या रकमेच्या दुप्पट लावू जाऊ शकत पण त्याहून अधिक नाही. पण काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत्त बँकांनी ३ ते ४ पत व्याज लावले असल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. आणि त्यामुळे हा अहवाल सादर केला आहे.

म्हणाले की, ‘खरतर जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुप्पट व्याज रक्कम वसूल करता येत नाही. म्हणजे १ लाख जर कर्ज घेतलं असलं तर २ लाखांपर्यंतच व्याजासहित आणि मुद्दल असे एकूण २ लाखांवरती त्यांना वसूल करता येणार नाही. पण बर्याच मध्यवर्ती बँकेने त्याच्या दुप्पटच्या वरती तिप्पट वसूल केलेले आहे. मी अकोल्याचा पालकमंत्री असल्यामुळे पाच – सहा दिवसांपूर्वीचं त्याची सगळी माहिती मी बँकेकडून बनवली आहे. तसेच ‘२-३ दिवसात ती सगळी माहिती येणार आणि असं कुठ झालं आहे का ? की तिथे दुप्पट वसुली झाली असले त्याची पाहणी करणार आहे. ४४अ प्रमाण जो सरकारी अभिनियम आहे, त्यामध्ये सरळ म्हणालं आहे की, दुप्पट वसूल करू नये. आणि दुप्पट वसूल केले असेलं तर ते तपासलं पाहिजे. आणि दुप्पट वसूली झाली असल्यास ती शेतकऱ्यांना परत केली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.